कोल्हापूरात संतापाची सही...
महाराष्ट्राच्या राजकारणाचा अक्षरशा चोता झाला आहे .यामुळे महाराष्ट्राची राष्ट्रीय पातळीवर प्रतिमा खराब झाली आहे. आप आपल्या युत्या आणि आघाड्या तोडून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सत्ता स्थापन करुन महाराष्र्टातील मतदारांचा अपमान केला आहे, यामुळे महाराष्ट्राच्या जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. याचा निषेध जनतेने नोंदवावा यासाठी मनसेनं एक सही संतापाची हा उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती मनसेचे कोल्हापूरचे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी दिली. गेल्या दोन दिवसापासून हा उपक्रम कोल्हापूर शहरांमध्ये राबवण्यात आला.यावेळी अनेक नागरीकांनी सह्या करत सरकारचा निषेध केला. या उपक्रमात मनसेचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Comments
Post a Comment