Posts

Showing posts from August, 2023

कळंबा तलाव वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी व लोकप्रतिनीधींना साकडे...

Image
  कळंबा तलाव वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी व लोकप्रतिनीधींना साकडे. कोल्हापूर : कळंबा आणि पाचगाव गावासह कोल्हापूर शहराला वरदान ठरलेला कळंबा तलावाचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. कळंबा तलावाची निर्मिती करत असताना छत्रपती शाहू महाराजांनी कळंबा तलावाला मिळणारे जलस्तोत्र ,ओढे, नाले यांना धोका पोहोचू नये तसेच कळंबा तलाव प्रदूषित होऊ नये यासाठी या ठिकाणी असणारे बालिंगा गावाचं स्थलांतर केलं. हा राजर्षी शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि  यामागचा मोठा विचार होता. मात्र या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीला आणि विचारांना हाडताळ फासण्याचे काम एक बिल्डर करत आहे. याच परिसरात एका बिल्डर नंदीनी जाधव नगराची निर्मीती करत असल्याचे दिसत आहे. यामुळे कळंबा तलावाच्याच पाणलोट क्षेञात वसणार्‍या  या नगरामुळे ओढे, नाले तसेच कळंबा तलावाला मिळणारे जल स्तोत्र जवजवळ नष्ट झाले आहेत. यामुळे पावसाळ्यात महीना महीनाभर वहाणारा कळंबा  तलाव अवघ्या चारच दिवसात व्हायचा बंद झाला आहे. यावरून  तलावाला मीळणारे जल स्तोत्र नष्ट झाल्याचे  स्पष्ट होत आहेत .यामुळे कळंबा तलावाचे अस्तीत्वच धोक्यात आले आहे...

राष्र्टवादीचे संघटन वाढवण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन करणार - नितीन पाटील

Image
 कोल्हापूर :- कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्यावतीने मेळाव्याच आयोजन करण्यात आल होत. यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष व्ही. पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या मेळाव्याचे आयोजन कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादीचे प्रमुख नितीन पाटील यांनी केल होत.सत्कारानंतर बोलताना व्ही बी पाटील यांनी देशाचे माजी कृषीमंञी शरद पवार यांचे विचार तळागळापर्यंत पोचवुन पक्ष संघटना बळकट करण्याचे अहवान कार्यकर्त्यांना केले.नितीन पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मध्ये राष्र्टवादीचे संघटन वाढवण्यासाठी गावोगावी आणी प्रभागांमध्ये मेळाव्यांचे आयोजन करणार असल्याच यावेळी सांगीतले.मेळाव्याला शहर अध्यक्ष आर के पवार,पीटर चौधरी, सुनिता कांबरे, गणेश नलवडे, सुनील देसाई ,माजी नगरसेवक संजय मोहिते, निरंजन कदम, प्रणती माळी, मोतीलाल चव्हाण, पुष्पराज पाटील, निजामुद्दीन मुल्ला, सुरेंद्र माने, शंकर भांबोरे, मारुती सुतार, हेमलता पोळ, राणी चव्हाण, सुरज पवार ,दीपक कषप, दिलावर पठाण, प्रवीण पाटील, राहुल कदम, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, जेष्ठ नागरीक उपस्थीत होते.

अण्णाभाऊंच्या विचारांची गरज- सरीता सासने

Image
 कोल्हापूर :- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे हीच अण्णाभाऊ साठेंना खरी आदरांजली ठरेल असं प्रतिपादन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केलं, ते कोल्हापुरातील टिंबर मार्केट येतील न्यू एकता तरुण मंडळाच्या वतीने लोक शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमीत्य आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी बोलताना सरिता सासने यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आज समाजाला गरज असल्याचे सांगून पद्माराजे महिला संघटनेच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली, यावेळी पद्माराजे महिला संघटनेच्या कार्यकर्त्या सुषमा सावंत,विजय काळे यांनीही मनोगतं व्यक्त केलीत.यावेळी विद्यार्थांना शालेय साहीत्याचही वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पद्माराजे संघटनेच्या सचिव आरती वाळके, आरपीआयचे करवीर तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर, मंगलराव माळगे, दत्ता मिसाळ, यांच्यासह न्यु एकता मंडळाचे करण ...