Posts

Showing posts from September, 2025

पर्यावरण पुरक घरे बांधणे काळाची गरज- पालकमंञी प्रकाश आबिटकर

Image
 कोल्हापूर( प्रतिनिधी): ग्लोबल वार्मिंग मुळे बदलत्या वातावरणात पर्यावरण पूरक घर बांधणी ही काळाची गरज असल्याचे मत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणी राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांनी व्यक्त केले. कोल्हापूर सिव्हिल इंजिनिअर आणि कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कोल्हापूर आणि अल्ट्राटेक सिमेंट्स यांच्या वतीने आयोजित ,अभियंता दिन व उत्कृष्ट अभियंता पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र लोहार होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शितल शिंदखेडे, सागर छागाणी, प्राचार्य जयंत घेवडे यांच्या उपस्थितीत डॉक्टर एम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्य जयंत घेवडे आणी शितलराज शिंदेखेडे यांनी पर्यावरण पूरक घरांसाठी आवश्यक सर्व माहीती उपस्थित मान्यवरांना दिली.  यावेळी उत्कृष्ट अभियंता पुरस्काराचे वितरण पालकमंञ्यांच्या हस्ते करण्यात आले. तर उत्कृष्ट अभियंता जीवनगौरव पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे स्थापत्य  विभागाच...

शिवराज पाटील यांच्या सामाजीक कार्यावर प्रकाशझोत...

Image
 कोल्हापूर ( प्रतिनिधी): सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेले शिवराज पाटील यांना समाजाप्रती काहीतरी करण्याची पहिल्यापासूनच तळमळ होती. सुरवातीच्या काळात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू केले. त्यातूनच जम बसवत त्यांनी वरदविनायक पार्कची स्थापना केली. बघता बघता वरद विनायक पार्क ह्या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षांमध्ये रूपांतर झालं आणि एक नामवंत उद्योजक म्हणून ते कोल्हापुरात नावारुपास आले. सुर्वेनगर प्रभागात सामाजिक कार्याचा वसा हाती घेतलेल्या विजयकुमार धनाजी कांबळे या सामाजिक कार्यकर्त्याची समाजाप्रती धडपड पाहून आपण ही काही समाजाचे देण लागतो या उद्देशाने उद्योजक शिवराज पाटील यांनी विजयकुमार कांबळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याचे ठरवले आणि यातुनच श्री शिवराज पाटील दादा सोशल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रभागामध्ये अनेक विकास काम करण्यात आली.यामध्ये प्रभागातील भाजी मंडईची स्वच्छता, प्रभागामध्ये महिलांच्या हस्ते वृक्षारोपण,गणेश उत्सवामध्ये गणेश विसर्जनाची सोय, प्रभागामध्ये ड्रेनेजची साफसफाई करून घेणे, पूर परिस्थितीमध्ये नागरिकांना मदत करणे,  स्वखर्चातुन गट...

पार्श्वनाथ बँकेच्या नवीन ठेव आणी कर्ज योजनांचा लाभ घ्या-शंकर पाटील

Image
 कोल्हापूर ( प्रतिनिधी ): विश्वासार्तेसह शाश्वत बँकिंग सेवा देणारी आणी सभासदांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून कोल्हापूरातील पार्श्वनाथ बँकेची ओळख आहे. पार्श्वनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेची अठ्ठावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीस बँकेचे संचालक संजय देसाई यांनी सभासदांचे स्वागत केले, तर प्रोसिडिंगचे वाचन अमर निरुखे यांनी केलं. यानंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयसिंग पाटील यांनी सभेच्या नोटीसीचे वाचन केलं आणि बँकेच्या वार्षीक प्रगतीचा लेखाजोखा सभासदांसमोर मांडत यापुढेही बँकेकडून तत्पर सेवेची ग्वाही दिली. तर बँकेचे अध्यक्ष विनोद मेहता यांनी सभासदांनी बँकेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सभासदांचे आभार मानले तर बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेन्टचे अध्यक्ष शंकर पाटील यांनी सभासदांना बँक सुरुवातीपासूनच बँकेच्या अत्याधुनिक सेवा सुविधा पुरवीत आहे, बँकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे, बँक रिझर्व्ह बँक व सहकार खात्याच्या नियमानुसार कामकाज करून सभासदांच्या विश्वासात पात्र ठरली असल्याचे सांगत यावर्षी बँकेचा एनपीए शून्य टक्के असून सभासद खातेदार यांनी केलेल्या ...