Posts

Showing posts from May, 2024

महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांच्या सहभागामुळे कळंब्याचे कुस्ती मैदान झाले लक्षवेधी...

Image
   कोल्हापूर (प्रतिनिधी): कळंबा गावचे आराध्य दैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई यात्रेनिमित्त कळंबा येथे मंगळवारी जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते. या कुस्ती मैदानात राज्यस्तरीय मल्लांनी  भाग घेतला होता. गेली सात वर्ष कुस्ती क्षेत्राला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी कळंब्याचे माजी सरपंच सागर भोगम हे विशेष प्रयत्न करत आहेत. दरवर्षी ते प्रथम क्रमाकांचे बक्षीस देत आले आहेत.याहीवर्षी सागर भोगम आणि संतोष लोहार यांनी प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस जाहीर केलं होतं. यामुळे या कुस्ती मैदानाकडे संपूर्ण करवीर तालुक्याचे लक्ष लागून राहिलं होतं. यामध्ये प्रथम क्रमांकाच्या दोन कुस्त्या खेळवण्यात आल्या. या कुस्ती मैदानात हसन पटेल उपमहाराष्ट्र केसरी आणि सोनू कुमार पंजाब केसरी यांची लढत झाली यामध्ये हसन पटेल यांनी सोनू कुमार याला चितपट करून विजय मिळवला. तर दुसऱ्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यामध्ये कुस्ती झाली. मात्र ही कुस्ती कंटाळवाणी झाली. दोन्ही मल्लांनी फक्त बचावाचा  पवित्रा घेतल्यामुळे ही कुस्ती तब...

कळंब्यातील नागरीकांची एकजुट आणी अमाप उत्साह बनला कौतुकाचा विषय...

Image
  कळंबा ( प्रिया चौगले हिचा स्पेशल रिपोर्ट):   करवीर तालुक्यातील कळंबा येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यात्रा काळात सालाबाद प्रमाणे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. कळंबा ग्रामपंचायत आणि श्री महालक्ष्मी अंबाबाई भक्तगण मंडळ यांच्या नियोजनातून यात्रेचे विविध कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने पार पडत आहेत. यावर्षी 8 मे ते 15 मे दरम्यान ही याञा  संपन्न होत आहे.श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदीरात ज्ञानेश्वरी पारायण आयोजीत करुन याञेस सुरवात झाली.  श्रावण साळुंखे महाराज यांच्या कीर्तनाचाही कार्यक्रम पार पडला.तर श्री महालक्ष्मी पतसंस्थेच्या सौजन्याने शाहीर आनंदराव पाटील यांच्या शायरी गाण्याचा कार्यक्रमही संपन्न झाला. तर कळंबा गावातील नागरिकांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून साकारलेल्या श्री महालक्ष्मी देवीची चांदीची उत्सव मूर्ती व चांदीची पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात्रेनिमित्त करवीर तालुक्यातील महे येथील विठू माऊली संगीत सोंगी  भजनी मंडळाच्या वतीने सोंगी भजन ही सादर करण्यात आले. सालाबाद प्रमाणे ...

कळंबा येथे बकर्‍याच्या टकरीच्या स्पर्धा संपन्न...

Image
कोल्हापूर ( प्रतिनीधी):कळंबा गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई यात्रेनिमित्त बकरी टकरी शौकीन ग्रुप कळंबा  यांच्या वतीने भव्य बकऱ्यांच्या टकरीच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन कळंब्याचे माजी सरपंच सागर भोगम, रोहित मिरजे ,भगवान पाटील, अरुण टोपकर ,उमेश भवड,सुहास जंगम,संदीप पाटील,विकास पोवार-बावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.  या स्पर्धा एकूण पाच गटात घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर सांगलीसह परिसरातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी झालेल्या बकर्‍यांच्या थरारक टकरी बघुन उपस्थीत प्रेक्षकांची मने जिंकलीत.

कळंबा गावाला कुस्तीची मोठी परंपरा...

Image
 कोल्हापूर (प्रतिनीधी ): कळंबा गावाला कुस्तीची मोठी परंपरा असून कळंबा गावामध्ये तीन तालीम मंडळे आहेत. श्री महालक्ष्मी तालीम,श्री हनुमान तालीम,श्री राम तालीम या तालीमींच्या माध्यमातुन गावातील पन्नासहुन अधीक युवक मल्ल विद्या शिकत आहेत. आज पर्यंत या तीन तालीमींच्या माध्यमातून कळंबा गावातून शेकडो पैलवान तयार झाले आहेत. तसेच दरवर्षी यात्रेनिमित्त कुस्त्यांचे मैदान भरून येतील मल्लांना प्रोत्साहन देण्याचे काम कळंबा ग्रामस्थ करत असतात. याही वर्षी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या याञे निमीत्य कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. कळंबा गावात अनेक  नव्या दमाचे मल्ल असून त्यांना शासनाकडून मदत मिळाल्यास ते राज्य आणि देशपातळीवर निश्चित चमकतील असा विश्वास सामाजीक कार्यकर्त्ये अरुण टोपकर आणी पैलवान सचिन कदम यांनी व्यक्त केला आहे.

कळंबा येथील मंदीरात होमहवनाचा विधी संपन्न...

Image
  कोल्हापूर ( प्रतिनाधी): आज सोमवारी कळंबा येथील श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. आज ऋषीमुनीसह देवी होम हवन करत असलेल्या रूपातील आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा श्री पुजक भिकाजी गुरव आणि महेश गुरव यांनी बांधली होती. तर आज गावातील बारा जोडप्यांच्या हस्ते मंदीरात होम हवन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच सागर भोगम,उत्तम जाधव, सुरेश नाईक,श्रीकांत पाटील, शशिकांत तिवले,विश्वास गुरव,अजित तिवले, बाजीराव पोवार, प्रकाश कदम,  विजय खानविलकर,उदय जाधव,संजय जाधव,दिपक तिवले,विश्वास खानवीलकर,तानाजी पाटील,दिलीप टिपुगडे,संग्राम जाधव,कृष्णात जंगम,भारत पाटील,सुहास जंगम, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  

कळंब्यातील नागरीकांना सदैव मदतीचा हात देणारी संस्था...

Image
   कोल्हापूर( प्रतिनिधी):कळंब्यातील महालक्ष्मी भिशी ही सर्वसामान्य नागरिकांची आधारवड बनली आहे .2500 सभासद असणाऱ्या भिशीचे चेअरमन सुभाष सावंत आणि संचालक रोहीत मिरजे ,संभाजी तिवले ,श्रीकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या महालक्ष्मी भिशीची वाटचाल सुरू आहे. महिन्याला तब्बल 14 लाख रुपयांची वर्गणी या भिशीमध्ये जमा होते. तर  भिशीची वार्षिक उलाढाल दीड कोटीच्या आसपास आहे ,तर वार्षिक कर्ज वाटपाचा आकडा तब्बल पावणे दोन कोटी वर आहे पोचला आहे .1947 साली या भिशीची स्थापना झाली तर 1976 साली श्री महालक्ष्मी पतसंस्थेची स्थापना झाली आहे.या पतसंस्थेचे चेअरमन म्हणुन दिलीप मीरजे जबाबदारी सांभाळत आहेत. या संस्थेमध्ये सहा कर्मचारी असून कर्मचाऱ्यांच्या कडून सभासदांना अतिशय आपुलकीची वागणूक दिली जाते. सभासदांच्या कोणत्याही अडीअडचणीला ही भिशी कोणत्याही कागदपत्राच्या अटी शिवाय फक्त जामीनावर कर्ज पुरवठा करते. तसेच प्रत्येक सभासद हा एक आपल्या कुटुंबातील घटक आहे अशा प्रमाणे सर्वच संचालक मंडळ सभासदांना वागणूक  देत आल्यामुळे दिवसेंदिवस या भिशीची वाटचाल उंचावत चालली आहे.  

कै.रामभाऊ चव्हाण यांच्या जयंती निमीत्य विविध सामाजीक उपक्रम संपन्न...

Image
  कोल्हापूर (प्रतिनिधी): कैलासवासी रामभाऊ चव्हाण  यांनी कोल्हापुरात अनेक समाज कामे करत कोल्हापूरकरांच्या मनावर एक ठसा उमटवला.रामभाऊ चव्हाण यांच्याच माध्यमातून शिवसेना पक्षाची मुळे कोल्हापूरमध्ये रुजली गेली. त्यांचाच हा समाजकारणाचा वारसा घेऊन त्यांचे सुपुत्र सुजित चव्हाण हे देखील शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून कोल्हापुरात कार्यरत  आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून रामभाऊ चव्हाण यांचे नातू आणि सुजित भाऊ चव्हाण यांचे सुपुत्र प्रसाद चव्हाण हे देखील समाजकारणामध्ये अग्रेसर दिसत आहेत. प्रसाद चव्हाण यांच्या माध्यमातून रामभाऊ चव्हाण दादा फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजीक उपक्रम राबवले जात आहेत. आज रामभाऊ चव्हाण यांची जयंती निमीत्य सालाबाद प्रमाणे यावर्षीही रामभाऊ चव्हाण फाउंडेशन च्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी रामभाऊ चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.तसेच  फाउंडेशनच्या वतीने मागील वर्षी लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचबरोबर कोल्हापुरातील 15 अंध जोडप्यांना स...

कात्यायणी भेटीचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न...

Image
कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील कळंबा येथील श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचा यात्रेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू आहे. रवीवारी  देवीची श्री शैल्यपुञी रुपातील देवीची आकर्षक पुजा बांधण्यात आली होती.ही पुजा श्रीपुजक महेश गुरव यांनी बांधली.दरम्यान रवीवारी सकाळी कात्यायणी देवीच्या भेटीचा पालखी सोहळाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या पालखी सोहळ्यामध्ये हजारो भक्तगणांबरोबरच असंख्य महिला देखील सहभागी झाल्या होत्या. टाळ मृदंगाच्या गजरात आणि शंखध्वनीच्या गजरात पालखी सोहळा कळंबा येथुन कात्यायणी मंदीराकडे मार्गस्थ झाला. यावेळी कळंबा गावचे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर, कळंबा तलावा शेजारी असणार्‍या वृक्ष गणेश  आणि कात्यायणी देवीच्या मंदिरात आरती सोहळा मोठ्या भक्ती भावाने पार पडला.यानंतर उपस्थीत भाविकांना सामाजीक कार्यकर्ते,विविध संस्था संघटनांच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले. पालखी सोहळ्यामध्ये कळंबा गावच्या सरपंच सुमन गुरव, उपसरपंच वैशाली टिपुगडे, सागर भोगम,दिलीप मीरजे,भारत पाटील,सुहास जंगम, उत्तम सुतार, सुरेश नाईक, विश्वास गुरव, शशिकांत तिवले, तानाजी पाटील,प्रकाश कदम,उत्तम ...

कळंबा येथील श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदीरात विविध धार्मीक कार्यक्रम संपन्न...

Image
  कोल्हापूर (प्रतिनाधी) : शनिवारी कळंबा येथील महालक्ष्मी अंबाबाई मंदिरामध्ये  श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीची अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. यावेळी  देवीच्या चांदीच्या उत्सव मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना  करण्यात आली. यावेळी होम हवन करण्यात आले. हा विधी पंचायत समितीच्या माजी सभापती मीनाक्षी पाटील आणि त्यांचे पती भगवान पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.सकाळच्या सञात मंदीरात विविध धार्मीक कार्यक्रम पार पडले.यावेळी पंचायत समीतीचे माजी सभापती दिलीप टिपुगडे,  भिकाजी गुरव,महेश गुरव,  संजय गुरव, संतोष गुरव, प्रथमेश गुरव, तानाजी गुरव, प्रवीण गुरव,तानाजी पाटील, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कळंबा येथे भव्य मिरवणुक सोहळा संपन्न...

Image
  कोल्हापूर ( प्रतिनिधी) :करवीर तालुक्यातील कळंबा येथील श्री महालक्ष्मी अंबाबाई  देवीच्या यात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी कळंबा ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून साकारलेली चांदीची पालखी व देवीची चांदीची उत्सव मूर्ती वाजत गाजत गावात आणण्यात आली. कळंबा येथील भाजी मंडई पासून चांदीच्या पालखीची आणि चांदीच्या उत्सव मूर्तीची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या मिरवणुकीत धनगरी ढोल आणि लेझीम पथक सामील झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती.  या मिरवणुकीमध्ये शेकडो भक्तगण सहभागी झाले होते. यावेळी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर येथे पालखी आल्यानंतर भव्य आतीषबाजी करण्यात आली. यावेळी गावच्या सरपंच सुमन गुरव ,बाजीराव पोवार, प्रकाश कदम, उमेश भवड, विश्वास गुरव, विजय खानविलकर,दिलीप मीरजे, विश्वास खानविलकर, शशिकांत तिवले,सुरेश नाईक,रणजीत कोंडेकर,भगवान पाटील,उत्तम जाधव,अरुण टोपकर,कृष्णात जंगम यांच्यासह  महीला, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते…