Posts

Showing posts from April, 2026

केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम लवकरात लवकर पुर्ण करा-अन्यथा आंदोलन..

Image
 केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम कासवगतीने-बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीचा जनआंदोलनाचा इशारा. कोल्हापूर (प्रतिनिधी) दिनांक २५:- महाराष्ट्राच्या मुख्य सांस्कृतिक केंद्रांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूरचे केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीच्या भक्षस्थानी पडले. या घटनेला आता तब्बल दोन वर्षे पूर्ण होत आहेत.नाट्यकर्मींचा रेटा, कोल्हापुरातील संघटनांचा दबाव यामुळे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाला सुरुवात झाली खरी.. परंतु अत्यंत कासव गतीने चालणारे हे काम प्रशासनाच्या सुस्तपणामुळे दिवसेंदिवस प्रलंबित पडत आहे. कोल्हापूरच्या जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणात होत असणारा विलंब हा रंगकर्मीबरोबरच कोल्हापूरच्या जनतेला वेदनादायी तसेच संतापजनक ठरणारा आहे.नाट्यगृहाच्या पार्किंगचे काम संपूर्ण रखडले आहे. नाट्यगृहातील बाहेरच्या परिसरातील कामे संपूर्णपणे ठप्प असून, नाट्यगृहाच्या आतील भागाचे नूतनीकरण अर्धवट अवस्थेत आहे. अतिशय संथपणाने काम चालू असल्यामुळे एक वर्षात हे नाट्यगृह पूर्ण होईल अशी प्रशासनाची घोषणा ही निव्वळ वल्गना ठरली आहे. स्वच्छतागृह, पार्किंगची सु...

कोल्हापूरात खासदारांचा निषेध...

Image
 कोल्हापूर शिवसेना शहर यांच्या वतीने खासदार निशिकांत दुबे यांचा जाहीर निषेध.. कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवसेना नेते युवा सेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांच्या बद्दल खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत चुकीच्या पद्धतीचे अपमान जनक विधान केले, ज्या विधानात काही सत्य नाही, काही तथ्य नाही, यामुळे निशिकांत दुबे यांचे आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे , म्हणूनच कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने,  शहर प्रमुख मंजीत माने यांच्या नेतृत्वाखाली, दसरा चौक येथे निशिकांत दुबे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शिवसेनेच्या वतीने निदर्शने केली, तसेच निशिकांत दुबेनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली. दुबे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला, यावेळी  निशीकांत दुबेंच्या निषेधार्थ कोल्हापूरी चप्पलाची प्रतिकृती केली होती हे कोल्हापूरी चप्पल लक्षवेधक ठरले.यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, महिला जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे, उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत,शहर प्रमुख विशाल देवकुळे, ...

पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरण; १० जणांविरुद्ध दोषारोपपत्र...

Image
 १८ दिवसांत तपास पूर्ण; न्यायालयात दोषारोपपत्र दाखल! यादव पती-पत्नीचाही जबाब; पत्रकारांचे उपोषण तात्पुरते स्थगित... चिपळूण (प्रतिनिधी) : शहरात खळबळ उडवून देणाऱ्या पत्रकार दीपक भागवत यांच्यावरील जीवघेण्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी जलद गतीने तपास पूर्ण करत महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. अवघ्या १८ ते १९ दिवसांत तपास पूर्ण करून सोमवारी (दि. १३ एप्रिल) चिपळूण येथील न्यायदंडाधिकारी वर्ग-१ न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात आले. या प्रकरणात चिपळूण नागरी पतसंस्थेच्या १० कर्मचाऱ्यांना आरोपी करण्यात आले आहे.मारहाणीच्या या संतापजनक घटनेनंतर पत्रकार संघटनांनी आक्रमक भूमिका घेत निषेध आंदोलनाचा इशारा दिला होता. विशेषतः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र पोलिसांनी भारतीय न्याय दंड संहिता २०२३ अंतर्गत कलम ४०० लागू करून पुढील कार्यवाही सुरू केल्याने पत्रकारांनी जाहीर केलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. ओळख परेड, पुरावे आणि जबाब नोंदणी तपासादरम्यान फिर्यादी दीपक भागवत यांच्या उपस्थितीत संशयित आरोपींची ओळख परेड घेण्यात आली. तसेच भागवत यांच...

कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरच्या विकासात मैलाचा दगड ठरेल : आमदार राजेश क्षीरसागर

Image
 *आंतरराष्ट्रीय दर्जाला आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक प्रतिमेला साजेसे काम करा; पाहणी दरम्यान आ.क्षीरसागर यांच्या अधिकारी आणि ठेकेदारांना सूचना* कोल्हापूर दि.१३ : कोल्हापूर जिल्हा हा आसपासच्या सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सीमा भागाशी सलग्न असून, या सर्वांचे केंद्रस्थान कोल्हापूर आहे. कोल्हापूर जिल्हा विविध कलागुणांना वाव देणारा जिल्हा असून, कोल्हापूर जिल्ह्यात इंजिनीअरींग असोसिएशन, आर्किटेक्ट असोसिएशन, डॉक्टर्स असोसिएशन, बार काॅन्सील अशा विविध संघटना या ठिकाणी कार्यरत आहेत. परंतु, विविध संघटनांच्या सामुहिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण याकरिता एखादा जाहीर कार्यक्रम, बैठक, पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी शासनाचे अधिकृत कोणतेही केंद्र जिल्ह्यात उपलब्ध नाही. यामुळे विचारांचे आदान- प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण यावर मर्यादा येत आहेत. यावर पर्याय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात आधुनिक सोयी सुविधांनी युक्त आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर निर्मिती करण्याची मागणी मी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य करून आं...

पत्रकार दिपक भागवत यांना मारहाणीच्या निषेधार्थ चिपळुणमध्ये मुक मोर्चा

Image
 पत्रकार दीपक भागवत यांच्यावरील हल्ल्याचा निषेध;  चिपळूणमध्ये मूक मोर्चा- दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा.. चिपळूण | प्रतिनिधी- दूरदर्शनचे प्रतिनिधी आणि ज्येष्ठ पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज चिपळूण शहरात राधाई फाउंडेशनच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. बहादूरशेख नाका ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चाद्वारे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.हा महापुरुषांना अभिवादन करून मोर्चाची सुरुवात- मोर्च्याच्या प्रारंभी बहादूरशेख नाका येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. हातामध्ये निषेधाचे फलक आणि दंडाला काळी फीत बांधून सहभागी आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आपला संताप व्यक्त केला. हा मोर्चा मार्कंडी मार्गे शिवसृष्टी येथे पोहोचला, तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर चिंचनाका आणि बसस्थानक मार्गे हा मोर्चा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर धडकल...

भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता-कै.बाबा देसाई

Image
 सागर चौगले(कोल्हापूर ब्रेकिंग-मुख्य प्रतिनिधी): कोल्हापूर महापालिकेत  किंवा कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजप सत्तेवर येईल तसेच कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे आमदार होतील हे असे जर पंधरा वर्षांपूर्वी कोणी म्हटले असते तर त्याला वेड्यात काढले गेले असते. मात्र हे शक्य झाले ते भाजपच्या मोजक्याच पण कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्त्यामुळेच... असेच एक भाजपचे कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणजे दिवंगत विजय उर्फ बाबा देसाई... बाबा देसाईंनी आपली पूर्ण हयात भाजप पक्ष वाढीसाठी घालवली. जनसंघाच्या विचारावर चालणारे बाबा देसाई यांनी कधीही स्वार्थासाठी राजकीय तडजोड केली नाही. आणि म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे रुजवली गेलीत.जनसंघापासून ते भारतीय जनता पार्टीपर्यंतचा बाबा देसाई यांचा प्रवास म्हणजे संपूर्ण आयुष्य भाजपसाठी अर्पण केल्यासारखेच होते. असे म्हटल्यास वावगे ठरु नये. कोल्हापूर जिल्ह्यात ज्यांनी भाजपचा पाया रचला त्यापैकी एक सच्चा आणी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे बाबा देसाई होय. आज कोल्हापूर जिल्ह्यात भाजप यशाच्या शिखरावर असल्याचे जे चित्र दिसते ते बाबा देसाईं यांच्यासारख्या कार्यकर्...

महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम' राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर

Image
 'महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम' राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर; आपत्ती व्यवस्थापनास बळकटी देण्याकरिता विविध उपाययोजना राबविण्यात येणार कोल्हापूर(प्रतिनिधी) दि.०७ : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने मित्र संस्थेच्या अंतर्गत महाराष्ट्र रिझीलन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम  हा प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत अधिकृत मान्यता देण्यात आली. यासाठी २ हजार २४० कोटी अर्थसाहाय्य जागतिक बँकेकडून घेण्यात येणार आहे. एकूण ३ हजार २०० कोटींचा हा प्रकल्प असून, ९६० कोटी रुपये राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. त्यानुसार या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ७ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत 'महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम'  राबविण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. हा कार्यक्रम प्रामुख्याने आपत्ती व्यवस्थापन बळकट करण्यासाठी आणि पूरप्रवण क्षेत्रांमधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी आखण्यात आला आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्य...

मराठा समाजाबरोबरच बहूजन समाजाचा विकास साधुया-बन्सीदादा डोके

Image
 राष्ट्रीय मराठा महासंघाच्या शहराध्यक्षपदी सागर चौगले यांची निवड.. कोल्हापूर(प्रतिनिधी):  महाराष्ट्रात कार्यरत असणारी राष्ट्रीय मराठा महासंघ या संघटनेच्या कोल्हापूर शहराच्या अध्यक्षपदी सागर चौगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बन्सीदादा डोके यांनी कोल्हापुरातील शासकीय विश्राम गृह येथे झालेल्या मराठा बांधवांच्या मेळाव्यात त्यांच्या नियुक्तीची घोषणा करून त्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणून उदयसिंग खोत, कुलदीप सावरतकर यांचीही नियुक्ती करण्यात आली. तर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून नगरसेवक सुनील वाडकर, जिल्हा समन्वयक म्हणून माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, जिल्हा सरचिटणीस म्हणून राज बडकस, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत पाटील, युवराज पाटील, अमर जत्राटे तर जिल्हा सचिव म्हणून दत्तात्रय कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्हा वहातुक संघटनेच्या अध्यक्षपदी दिपक पाटील तर कामगार आघाडीच्या अध्यक्षपदी सुनिल पाटील यांची निवड करण्यात आली.यावेळी बोलताना बन्सीदादा डोके यांनी राष्ट्रीय मराठा महासंघ ही संघटना मराठा समाजाबरोबरच बहुजन समाजासाठी काम क...