Posts

वार्ड तिथे शाखा-शिवसेनेच्या उपक्रमाचा धडाक्यात शुभारंभ...

Image
 कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने ताराबाई पार्क येथे शाखेचा शुभारंभ   कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवसेनेची शाखा म्हणजे शिवसैनिकांची शान,मान,अभिमान असतो. शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्य केली जातात, लोकांच्या  अडीचणींची निरासरण केले जाते हीच परंपरा अशीच अखंडीतपणे सुरु रहावी अशी अपेक्षा शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी व्यक्त केली.ते कोल्हापूरातील ताराबाई पार्क येथील शाखेचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते.ही शाखा शिवसेना शहर प्रमुख मंजित माने यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आली आहे.याप्रसंगी बोलताना शिवसेनेचे उपनेते संजय पवार म्हणाले, सगळ्या शिवसैनिकांनी  संकटकाळी आपली जबाबदारी समजून एकत्र येणे गरजेचे असुन शाखांच्या माध्यमातुन शिवसेनेचे संघटन मजबुत करणे ही काळाची गरज आहे.तर शहर प्रमुख मंजित माने यांनी येणाऱ्या सहा महिन्यात शहर प्रमुख या नात्याने वार्ड तेथे शाखा सुरु करण्याचा मानस व्यक्त केला.यावेळी अनेक पदाधिकार्‍यांना निवडीचे पत्रे देखील देण्यात आली. याप्रसंगी सह संपर्कप्रमुख विजय देवणे, अवधूत साळुंखे,स्मिता सावंत, रीमा देशपांडे, पप...

पुण्यात विषारी दारुचा कहर,तब्बल बावीस जणांचा मृत्यू..

Image
 पुण्यात विषारी दारुचा कहर,तब्बल आठराजणांचा मृत्यू पुणे (प्रतिनिधी): पुण्यात विषारी दारू ने कहर केला असून पुण्यात गेल्या दोन दिवसात पिंपरी चिंचवड  आणी हडपसर येथे गावठी दारू पिल्यामुळे तब्बल बावीसजणांचा मृत्यू झाला आहे, यामुळे पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला  आहे.विषारी दारूच्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कठोर कारवाईच्या आदेश दिले आहेत.दरम्यान विषारी दारु प्रकरणी पोलीसांनी तपासाची सुत्रे जलदगतीने फीरवली असुन योगेश वानखेडे या तरुणास अटक केली आहे. कोल्हापूर ब्रेकिंग न्यूज पोर्टलवर बातम्या देण्यासाठी-8483899521आणी 9326499921 या मोबाईल नंबरवर संपर्क करा

मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरातुन एल्गार...

Image
 मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरातुन एल्गार... कोल्हापूर (प्रतिनिधी): मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.या आंदोलनाला कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. आज सकल मराठा बांधवांच्या उपस्थितीत त्यांनी हा पाठिंबा दर्शवला.यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज यांनी  कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी आग्रही भुमीका मांडली.तर मराठा योध्दे बाबा इंदुलकर यांनी मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना ई मेल व्दारे पाटवल्याची माहीती दिली.याप्रसंगी मराठा बांधवांनी घोषणा देत परीसर दणाणुन सोडला. कोल्हापूरातील दसरा चौकात झालेल्या पत्रकार परीषदेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवणे, राष्ट्रीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष सागर चौगले, मराठा योध्दे दिलीप देसाई,बाबा पार्टे, गणी आजरेकर ,अनिल घाटगे,राज बडकस,काका पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

कोल्हापूरातील माजी विद्यार्थ्यांकडून शेणीदान उपक्रम..

Image
 कोल्हापूरातील माजी विद्यार्थ्यांकडून शेणीदान उपक्रम.. कोल्हापूर (प्रतिनिधी): वय वर्ष ६० ते ६५ वयोगटातील विद्यार्थी एकत्र आलेत.. मात्र तरुणांना लाजवेल असा उत्साह, थट्टा- मस्करी,जुन्या आठवणींना उजाळा देत प्रिन्स शिवाजी बोर्डिंग संचलित महाराष्ट्र हायस्कूलच्या सन १९७३-७४ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. एवढेच नव्हे तर  महाराष्ट्र हायस्कूलच्या या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पंचगंगा स्मशानभूमीस तब्बल दहा हजार शेणी अर्पण केल्या. त्याचबरोबर मतिमंद मुलांना देखील मदत केली. यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणी जाग्या केल्या. यावेळी एकमेकांची आदरपूर्वक विचारपूस करत या माजी विद्यार्थ्यांनी दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. या स्नेह मेळाव्यास शिवसेना महानगर प्रमुख शिवाजीराव जाधव,किशोर पारखे, संजय मंडलिक, कैलास माने, गजानन पोवार, श्रीकांत पौंडकर, रवींद्र साळुंखे,शिरीष साळोखे,किशोर पन्हाळकर यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.

साईराज जाधवची कळंब्यात जल्लोषी मीरवणुक...

Image
 साईराज जाधवची कळंबा गावात जल्लोषी मिरवणुक.. कळंबा (प्रतिनिधी): पुणे जिल्हा पोलीस दलामध्ये करवीर तालुक्यातील कळंबा येथील साईराज युवराज जाधव याची निवड झाल्याबद्दल कळंब्यातील नागरिकांनी त्याची जल्लोषी मिरवणूक काढली. यावेळी अनेक मान्यवरांनी  साईराज जाधव याला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी कळंबा गावच्या सरपंच सुमन गुरव, माजी सरपंच सागर भोगम, उत्तम जाधव, अरुण टोपकर, बाजीराव पोवार, उमेश भवड, सुरेश नाईक, प्रकाश कदम, संजय जाधव यांची प्रमुख उपस्थीती होती.तर मीरवणुकीमध्ये उपसरपंच रोहीत जगताप, दीपक तिवले, छाया भवड, भाग्यश्री पाटोळे, रोहित मिरजे,पुनम जाधव, संदीप पाटील, स्नेहल जाधव,विकास पोवार, मीना गौड, नितीश शिंदे, स्वरूप पाटील, दिपाली रोपळकर,वैशाली टिपुगडे, उदय जाधव, आशा टिपुगडे ,संगीता माने ,ग्रामसेवक विलास राबाडे गावातील विविध तरुण मंडळांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कळंबा यात्रेला उत्सवाचे स्वरुप..

Image
 कळंबा गावच्या यात्रेला उत्सवाचे स्वरुप,राज्यभरातुन हजारो भावीकांची देवीच्या दर्शनासाठी उपस्थीती.. कळंबा (प्रतिनिधी): राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टी कोनातून वसलेले गाव म्हणजे 'कळंबा' हे होय. कळंबा गावाला अख्यायिका असून करवीर महात्म्यात कोल्हासूर राक्षसाने कात्यायनीच्या डोंगरावर श्री महालक्ष्मी देवीची उपासना केली होती. कोल्हासूर श्री महालक्ष्मी देवीचा निस्सीम भक्त होता, एक दैत्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास देत होता. या दैत्याचा वध श्री महालक्ष्मी देवीच्या वरदानाने कोल्हासूराने केला. या कोल्हासूराच्या पत्नीचे नाव कळंबादेवी, कळंबा देवीला तीन पुत्र होते. त्यातील एक पुत्र करवीरासूर हा होता. त्यामुळेच कोल्हापूरला करवीरनगरी असे संबोधले जाते. त्यानंतर करवीराचा माता व कोल्हासूराची पत्नी कळंबादेवी हिचे स्थान म्हणून कळंबा गाव निर्माण झाले.पूर्वी कात्यायनी शेजारी बालिंगा गाव होते.ह्या गावाच्या खालच्या बाजुला कळंबा तलावास लागुन जुन्या कळंबा गाव होते. गावात कळंबा देवीचे छोटेसे दगडी बांधकाम असलेले मंदीर होते. ते आजही त्या ठिकाणी असून विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. या ठिकाणी स्वयं...